Published On Jun 6, 2023
शेतमालावर प्रक्रिया करून मिळवा दुप्पट हमीभाव | Vegetable Dehydration Business | Shivar News 24
आज कसुरी मेथी, पाकिटबंद कोथंबिर, मिरच्या मार्केटमध्ये खरेदी करायला गेलो तर 10-20 ग्रामची पुडी 100 रुपयांपर्यंत मिळते. पण, हीच भाजी ताजी घ्यायला गेलो तर दोन चार रुपयांत खरेदी करता येते. शेतकरी भाजीपाला, फळे पिकवून थेट दलाला, व्यापाऱ्यांना विकतो. त्यामुळे शेतकऱ्याला मनासारखा भाव मिळत नाही.याच भाजीपाल्यावर किंवा शेतीत पिकणाऱ्या कुठल्याही पिकावर उद्योजक प्रक्रिया करतात. यातून ते बक्कळ पैसा कमावतात. शेतमालातून नफा कमवायचा असेल तर सध्या भाजीपाला निर्जलीकरण उद्योग नफ्याचा ठरू शकतो. निर्जलीकरण (डिहायड्रेटर) यंत्र खरेदी करून शेतकरी शेतमाल वाळवून स्वतःच्या ब्रँडने विकू शकतो. काही शेतकरी छोट्या कंपन्यांना हा कच्चा माल विकू शकतात. डिहायड्रेशन म्हणजे, भाजीपाल्यातील सर्व पाणी काढून घेऊन तो वाळवणे. याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेऊ.
#dehydrationbusiness
#vegetabledehydration
#agriculturaldehydration
#agroprocessingbusiness
#marathiudyog
#shivarnews24