Published On Sep 16, 2024
शिवाजी महाराजांचे पराक्रम इतके भव्य आणि आश्चर्यकारक होते, की त्यांच्या शत्रूंच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात काही अफवा पसरलेल्या होत्या. शिवाजी महाराजांना हवेत नाहीसे होता येतं, त्यांना पंख आहेत म्हणजेच त्यांना उडता येतं, त्यांच्यात अशी काही शक्ती आहे की ते एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी असतात वगरे वगरे.... यावरूनच आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराजांच्या शत्रूंच्या आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात त्यांच्याबद्दल किती भीती होती..! शिवाजी महाराजांना पण या अफवांबद्दल कदाचित माहिती असावं आणि त्यांनी सुद्धा आपल्या हेर खात्याच्या मार्फत म्हणजेच बहिर्जी नाईक आणि त्यांच्या माणसांच्या मार्फत या अफवांना खत पाणी घालण्याचं काम केलं असावं, शत्रूच्या मनात आपल्याबद्दल भीती असावी, रणांगणावर पाऊल ठेवायच्या आधीच शत्रूचं मनोबल खचलेलं असावं, यासाठी त्यांनी हे केलं असावं, तुम्हाला काय वाटतं..? कॉमेंट बॉक्समध्ये लिहा...