Published On Jun 3, 2024
अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यातील शेवटचे गाव जे स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या सुमारे बाराशे ते तेराशे असून इथे मागच्या दहा वर्षांपासून वीज आलेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता की स्वातंत्र्यानंतर मागच्या दहा वर्षांपासूनच या गावात विजेची व्यवस्था आहे ती पण कधी असते कधी नसते. पावसाळ्यात या ठिकाणी जाण्याची मज्जाच वेगळी असते. येथे भरपूर पाऊस पडतो त्यामुळे येथील रहिवासी कधीकधी आठवडाभर घराबाहेर निघू शकत नाही. या गावाचा इतिहास म्हणजे इंग्रज अधिकारी पोट दर संडेला या गावात वीकेंडसाठी येत असे. म्हणून या गावाला पोप संडे असे नाव पडले व नंतर अपभ्रंश होऊन फोफसंडी नाव झाले. #maharashtratourism #heritage
show more